- डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन देत रिक्षा भाडेवाढीबाबत मागणी ।
डोंबिवली : डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन देत रिक्षा भाडेवाढीबाबत मागणी केली आहे. मागील दोन वर्षांत कोणतीही वाढ न देता आता १ सप्टेंबरपासून फक्त १ रुपये वाढ जाहीर करणे नाममात्र आणि अन्यायकारक असल्याचे सांगत खटवा समितीच्या अहवालानुसार महागाई निर्देशांकानुसार सन्मानजनक भाडेवाढ द्यावी, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि परिवहन आयुक्त यांनाही निवेदने देण्यात आली आहेत. मागील ११ वर्षांत फक्त पाच वेळा वाढ मिळाली असून नवीन रिक्षेची किंमत, इंधन, टायर, पंक्चर, सीएनजी पासिंग आणि इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे आरोग्य व सुट्ट्या भागांचे नुकसानही होते. १ सप्टेंबरच्या १ रुपया वाढीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. सरचिटणीस प्रमोद गुरव, संजय तिवारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे ।

Post Views: 9